जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Saturday, 30 June 2018

वसंतराव नाईक साहेब जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..--(गोर विकास चव्हाण)

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जीवनयात्रा
1 जुलै 1913 : यवतमाळ जिल्हातील पुसद तालुक्यातील गहुली येथे बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात जन्म.
1933 : नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
1937 : मॉरिस कॉलेज, नागपूर (सध्याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्था) येथून बी.ए. पदवी परीक्षा उत्तीर्ण.
1940 : नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी पदवी उत्तीर्ण.
1941 : प्रारंभी अमरावतीचे प्रख्यात वकील कै. बॅ. पंजाबराव देशमुख हयांच्या बरोबर व नंतर पुसद येथे स्वतंत्रपणे वकिली व्यवसायास प्रारंभ.
पुसद तालुक्यातील आदर्श ग्राम चळवळीत पुढाकार.
त्यांच्या प्रयत्नांमुळे व तळमळीमुळे त्यांचे स्वत:चे गाव ‘गहुली’ हे
आदर्श गाव बनले.
6 जुलै 1941 : प्रतिष्ठित ब्राम्हण घराण्यातील कु. वत्सला घाटे यांच्याशी विवाह केला. हा विवाह आंतरजातीय असल्यामुळे त्यांच्या बंजारा समाजात मोठी खळबळ उडाली. काही दिवस त्यांना वाळीत देखील टाकण्यात आले.
1946 : पुसद नगरपालिकेच अध्यक्ष म्हणून निवड. जुन्या मध्यप्रदेश राज्यात उपमंत्री म्हणून 1952 मध्ये नियुत्की होईपर्यत याच पदावर होते. हया अवधीत सुधारणाविषयक अनेक कामे केली.
1950 : पुसद हरिजन मोफत वसतिगृहाचे व दिग्रस राष्ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्यक्ष.
1951 : विदर्भ प्रदेश कॉंग्रेस समितीचे व कार्यकारिणीचे सदस्य.
1952 : पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नियुक्ती.
हयाच काळात मध्यप्रदेश गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्षपद भूषविले.
मध्यप्रदेश भू-सुधार समितीचे उपाध्यक्ष व मध्यप्रदेश सरकारच्या मेट्रिक समितीचे अध्यक्ष होते.
1956 : राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या मुंबई राज्यात सहकार, कृषी, दुगधव्यवसाय या खात्यांचे मंत्री म्हणून नियुक्ती.
अखिल भारतीय कॉंग्रेसचे तसेच महाराष्ट्र विभागीय कॉंग्रेस समितीचे व तिच्या कार्यकारिणीचे तेव्हापासून सदस्य.
1957 : सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेत पुसद मतदारसंघातून दुस-यांदा निवड झाली. महाराष्ट्र मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून नियुक्ती.
इंडिया कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल फायनान्स सोसायटीचे सभासद म्हणून निवड.
1958 : जपानला गेलेल्या आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात समावेश व जपानला भेट, टोकीयो येथे एफ.ए.ओ.च्याबैठकांना हजर.
1959 : पुसद येथे ‘फुलसिंग नाईक कॉलेज’ ची स्थापना. चिनी सरकारच्या शेतकी संघटनेच्या निमंत्रणावरुन चीनला भेट.
1960 : महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून नियुक्ती. हया वेळी शासनाने महत्वपूर्ण असा कमाल जमीनधारणा क्षेत्रासंबंधीच
ा कायदा संमत केला.
आपल्या मंत्रीपदाच्या कारकीर्दित त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले व महाराष्ट्रात पंचायती राज्याची मुहूर्तमेढ रोवली.
1962 : सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर यवतमाळ जिल्हातील पुसद मतदारसंघातून तिस-यांदा निवड होऊन पुन्हा महसूल मंत्री म्हणून नियुक्ती आणि मुख्यमंत्री होईपर्यत हेच खाते त्यांच्याकडे राहिले.
5 डिसेंबर 1963 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
1964 : युगोस्लाव्हियाचा दौरा.
1965 :1 मे 1965 रोजी आंतर भारती, मुंबई (इंडियन अॅकॅडमी ऑफ लेटर्स) संस्थेचे उद्घाटन.
भारत-पाक संघर्ष सुरु होताच 9 ते 11 सप्टेंबरला मुंबईत स्फूर्तिदायक व मार्गदर्शक भाषणे दिली. त्यामुळे महाराष्ट्रात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले. नंतर काही महिने युध्दसज्जतेसाठी महाराष्ट्राचा दौरा केला.
शेती उत्पादनाच्या नव्या कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्हांचा दौरा.
1966 : अवर्षणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. संकटात सापडलेलया शेतक-यांना हिंमत देण्यासाठी राज्यातील दुष्काळी जिल्हयांत झंझावती दौरा.
1967 : सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभावी प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा. या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर पुसद मतदारसंघातून चौथ्यांदा निवड होऊन 6 मार्च 1967 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर दुस-यांदा एकमताने निवड.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र विधानसभेत भाषण (17-11-1967)
1970 : अमेरिकी शासनाच्या निमंत्रणावरुन अमेरिकेचा दौरा व युरोपियदेशांना भेटी.
1972 : सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरा. या सार्वत्रिक निवडणुकीतून पुसद मतदारसंघातून पाचव्यांदा निवड होऊन 14 मार्च 1972 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिस-यांदा निवड झाली.
महाराष्ट्रात गंभीर स्वरुपाचा दुष्कह पडला होता. राज्यातील नऊ जिल्हांतील दुष्काळ हा देशातील इतर कोणत्याही भागातील दुष्काळापेक्षा अधिक तीव्र स्वरुपाचा होता; प्रत्येक जिल्हयात फिरुन त्यांनी दुष्काळी कामाला जोराने चालना दिली.
20 फेब्रु 1975 : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा.
12 मार्च 1977 : वाशिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड
18 ऑगस्ट 1979 : सिंगापुर येथे 66 व्या वर्षी निधन
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*जय सेवालाल जय गोर धर्म जय वसंतराव नाईक साहेब*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Share:

2 comments:

  1. Jay sewalal vasantarao naik yanchya jayanti nimitta hardik shubhechhya

    ReplyDelete
  2. महानायक वसंतराव नाईक अमर आहेत म्हणुन आपण कोणीही त्यांच्या नावा समोर कैलास वाशी किंवा स्वर्गीय हे शब्द वापरू नय ही नम्र विनंती

    ReplyDelete

Archive

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook