सोलापूर (दिनांक 17 ) पूर्वीच्या आंध्रप्रदेशात तेथील भौगौलिक परिस्थितीनुसार गोर बंजारा समाजाला लंबाडा म्हणून अनुसूचित जमातीच्या संविधानानुसार संवैधानिक सोयी सवलती संविधान लागू झाल्यापासून मिळतात. तेलगांना राज्यत आरक्षणाच्य मुद्यावरुन मागील काही दिवसांपासून दोन समाजात तनावाचे वातावरण होते . 13 डिसेंबर रोजी आपल्या संवैधानिक हक्कासाठी गोर बंजारा समाज लाखोंच्या संख़्येने रस्त्यावर येऊन विरोध दर्शविला होता . गोर बंजारा समाजाची एकी पाहून काही गौंड समाजाचे नेते गौंड समाजाला भडकुन 15 डिसेंबर रोजी आदिलाबाद जिल्हातील हसनापूर येथील गोर बंजारा समाजावर हल्ले करायला लावले . या हल्यात गोर बंजारा समाजाचे पाच लोक मृत्युमुखी पडले असून शंभराहून अधिक लोक गंभीर जखमी झालेले आहेत. अनेकांच्या मालमत्तेचीसुद्धा प्रचंड हानी केली गेलेली आहे . या अमानवीय घटनेमुळे देशभरातील गोर बंजारा समाजात प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे .
आज सोलापूर शहरात नेहरू नगर लगतच्या सेवालाल चौक येथे सर्व सोलापूरांतील गोर बंजारा बांधव एकत्र येऊन या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन तीव्र निषेध नोंदवण्यात आले. यावेळी गोर बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात प्रामुख्याने सोलापूरांतील नगरसेविका सौ मेनकाताई शिवराज राठोड,सामाजिक कार्यकर्ती सौ अश्विनी रविंद्र राठोड,राजू पवार(सेवालाल ज्वेलर्स),दिपक दादा पवार(JS ग्रुपचे अध्यक्ष)राजकुमार पवार(बंजारा दर्पण),सुरेश राठोड (मुळेगाव तांडा) सौ सविता राठोड,सौ सुनिता राठोड(ठाणे),शिवराज राठोड,राजकुमार राठोड,संजय चव्हाण,नितीन चव्हाण,रमेश राठोड,अनिल जाधव,राहूल चव्हाण,दिपक राठोड,योगेश राठोड,प्रेम राठोड,विनोद पवार,अक्षय पवार,रवि जाधव,पापा चव्हाण आदि उपस्थित होते.
*सौ अश्विनी रविंद्र राठोड*
0 comments:
Post a Comment