राष्ट्रिय गोरबंजारा साहित्य परिषद द्वारा आयोजित,
*दुसरे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन, नागपूर (महाराष्ट्र)*
दिनांक 24 आणि 25 डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडतोय.
याच पुर्वसंध्येला सर्व गोरबंजारा बांधवांना व साहित्यप्रेमींना आवाहन..
🙏🙏जय सेवालाल🙏🙏
साधारणतः आजघडीला माणसाचं सरासरी आयुष्य 60 ते 65 वर्षापर्यंत सिमीत झालेलं दिसून येते. परंतु साहित्यिकांचं, साहित्याचं आयुष्यमाण हे चिरकाल टिकणारं असतं आणि यातूनच समाज घडत असतो समाजाला योग्य दिशा मिळते.
समाजाचा सर्वांगिण विकास हा त्याच्या सामाजिक, वैचारिक, राजकिय, शैक्षणिक, म्हणजेच समकालिन साहित्यावर अवलंबून असतो किंबहुना तो समाजाचा आरसाच असतो. त्यातच साहित्य संमेलन म्हणजेच वेगवेगळ्या विचारसरणीच्या, विचारधारेच्या, विचारप्रवाहाच्या साहित्यिकांच्या डोक्याची आदळआपट तसेच विचारमंथन !!! याच विचारमंथनातून एक नाविण्यपुर्ण सामाजिक संस्कार साहित्य रसिकांना प्राप्त होतो. आणि त्यातून समकालिन तथा येणारी पिढी घडत असते.
सुप्रसिद्ध, पुरोगामी विचारसरणीचे, साहित्यातूनच नव्हे तर आपल्या प्रत्येक कृतीतून अंधश्रद्धे विरुद्ध, समाजातल्या पाखंडी चालीरितीविरुद्ध, दांभिक परंपरेविरुद्ध लढा उभारणारे, आपल्या साहित्यातुनच नव्हे तर प्रत्यक्ष कृतितून रस्त्यावर उतरुन लढा लढणारे, आपल्या साहित्याद्वारे अंधश्रद्धेविरुद्ध सडकुन टिका करणारे ! त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणारे *गोरबंजारा साहित्यिक, गुरूवर्य प्राचार्य श्री. ग.ह. राठोड (सर)* पूर्व संमेलनाध्यक्ष यांच्या व समविचारी गोरबंजारा बांधवांच्या पुढाकाराने पार पडतोय !!!
जो समाज स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, त्याच्या अस्तित्वासाठी प्राण्यांची शिकार करत राणावणात भटकत राहिला व काही काळ अंध्दश्रद्धा, दांभिक, वाईट प्रथा परंपरेचा शिकार झाला. आज तोच समाज गुरुवर्य प्राचार्य ग.ह. राठोड सरांसारख्या पुरोगामी विचारसरणीच्या साहित्यिकांमुळे स्वतःचं साहित्यच नव्हे तर अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते अजून भक्कम करण्यासाठी, समाजमनावर सकारात्मक, उपयुक्त संस्कार करण्यासाठी !!!
अंधश्रद्धा विरहित समाजनिर्मितीसाठी, वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण करण्यासाठी तसेच,
समाजाच्या वैचारिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्रांतिसाठी जथ्थाच्या जथ्था समाज, साहित्यिक, साहित्यप्रेमी जमा होतोय.
ही अभिमानास्पद गोष्ट आम्हा तरुणांसाठी एक आशेची पालवी निर्माण करते यासाठी,
*गुरुवर्य प्राचार्य ग.ह. राठोड सर, संमेलनाध्यक्ष डाॅ. सुनिता पवार (ताई) तसेच संयोजक, आयोजक,*
यांचे मनःपूर्वक आभार व साहित्य संमेलनाला हार्दिक शुभेच्छा !!!
🙏जय सेवालाल 🙏
गोरबंजारा साहित्यप्रेमी
गोर विकास चव्हाण
*दुसरे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन, नागपूर (महाराष्ट्र)*
दिनांक 24 आणि 25 डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडतोय.
याच पुर्वसंध्येला सर्व गोरबंजारा बांधवांना व साहित्यप्रेमींना आवाहन..
🙏🙏जय सेवालाल🙏🙏
साधारणतः आजघडीला माणसाचं सरासरी आयुष्य 60 ते 65 वर्षापर्यंत सिमीत झालेलं दिसून येते. परंतु साहित्यिकांचं, साहित्याचं आयुष्यमाण हे चिरकाल टिकणारं असतं आणि यातूनच समाज घडत असतो समाजाला योग्य दिशा मिळते.
समाजाचा सर्वांगिण विकास हा त्याच्या सामाजिक, वैचारिक, राजकिय, शैक्षणिक, म्हणजेच समकालिन साहित्यावर अवलंबून असतो किंबहुना तो समाजाचा आरसाच असतो. त्यातच साहित्य संमेलन म्हणजेच वेगवेगळ्या विचारसरणीच्या, विचारधारेच्या, विचारप्रवाहाच्या साहित्यिकांच्या डोक्याची आदळआपट तसेच विचारमंथन !!! याच विचारमंथनातून एक नाविण्यपुर्ण सामाजिक संस्कार साहित्य रसिकांना प्राप्त होतो. आणि त्यातून समकालिन तथा येणारी पिढी घडत असते.
सुप्रसिद्ध, पुरोगामी विचारसरणीचे, साहित्यातूनच नव्हे तर आपल्या प्रत्येक कृतीतून अंधश्रद्धे विरुद्ध, समाजातल्या पाखंडी चालीरितीविरुद्ध, दांभिक परंपरेविरुद्ध लढा उभारणारे, आपल्या साहित्यातुनच नव्हे तर प्रत्यक्ष कृतितून रस्त्यावर उतरुन लढा लढणारे, आपल्या साहित्याद्वारे अंधश्रद्धेविरुद्ध सडकुन टिका करणारे ! त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणारे *गोरबंजारा साहित्यिक, गुरूवर्य प्राचार्य श्री. ग.ह. राठोड (सर)* पूर्व संमेलनाध्यक्ष यांच्या व समविचारी गोरबंजारा बांधवांच्या पुढाकाराने पार पडतोय !!!
जो समाज स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, त्याच्या अस्तित्वासाठी प्राण्यांची शिकार करत राणावणात भटकत राहिला व काही काळ अंध्दश्रद्धा, दांभिक, वाईट प्रथा परंपरेचा शिकार झाला. आज तोच समाज गुरुवर्य प्राचार्य ग.ह. राठोड सरांसारख्या पुरोगामी विचारसरणीच्या साहित्यिकांमुळे स्वतःचं साहित्यच नव्हे तर अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते अजून भक्कम करण्यासाठी, समाजमनावर सकारात्मक, उपयुक्त संस्कार करण्यासाठी !!!
अंधश्रद्धा विरहित समाजनिर्मितीसाठी, वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण करण्यासाठी तसेच,
समाजाच्या वैचारिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्रांतिसाठी जथ्थाच्या जथ्था समाज, साहित्यिक, साहित्यप्रेमी जमा होतोय.
ही अभिमानास्पद गोष्ट आम्हा तरुणांसाठी एक आशेची पालवी निर्माण करते यासाठी,
*गुरुवर्य प्राचार्य ग.ह. राठोड सर, संमेलनाध्यक्ष डाॅ. सुनिता पवार (ताई) तसेच संयोजक, आयोजक,*
यांचे मनःपूर्वक आभार व साहित्य संमेलनाला हार्दिक शुभेच्छा !!!
🙏जय सेवालाल 🙏
गोरबंजारा साहित्यप्रेमी
गोर विकास चव्हाण
0 comments:
Post a Comment